येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मातुलठाण शिवारात रामदास कातोरे यांच्या मालकीच्या शेतातील उभ्या असलेल्या पवणे दोन एकर उसाला आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेची माहिती येवला अग्निशामक विभागाल समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली. या आगीमुळे शेतक-याचे मोठ नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.