इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
यातच तर खरी तत्परता आहे
दर्प, क्रोध व इतर उच्छृंखल मनोभाव यांच्याद्वारा दुसऱ्याकडून आपणावर हल्ला आला असताना धिमेपणाने, नम्रता राखून व समर्पणभावाने त्यास तोंड देणे यातच तर खरी तत्परता आहे. परंतु या धिमेपणाचे, नम्रतेचे व समर्पणवृत्तीचे खरे महत्त्व आहे. जेव्हा आपल्या स्वतःमधीलच दर्प, क्रोध आणि उच्छृंखल मनोभाव उसळून वर येऊन जगात अभिव्यक्त होऊ लागतील, तेव्हाच, आपल्या अंतःकरणांत एकसारखी घालमेल चालली असतांना, मन अस्वस्थ होऊन चंचल बनले असतांना, भावनांच्या उद्रेकाने अंतःकरणात वादळ घोंघावत असतांना, मनाचा गोंधळ उडाला असतांना, मनोदौर्बल्याने सर्व बाजूंनी घेरल्यामुळे सुरक्षितता नाहीशी झाली असतांनाच या सद्गुणांना चिकटून राहण्यांत खरा पुरुषार्थ आहे. पराक्रम आहे.