India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘इंदिरा गांधींनी ५० तर काँग्रेसने ९० वेळा निवडून आलेले सरकार पाडले’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

India Darpan by India Darpan
February 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपवर सातत्याने राज्य सरकारांना आणि प्रादेशिक नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतो. पण त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत कधीच बोलले नाहीत. आज मात्र त्यांनी संसदेत भाषण करताना काँग्रेसचा समाचार घेतला. काँग्रेसनेच सर्वाधिक राज्य सरकारे पाडली आणि प्रादेशिक नेत्यांना त्रास दिला, असे आरोप पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील चर्चेला उत्तर देत होते. या चर्चेमध्ये भाजपवर घटनेतील कलम ३५६ चा गैरवापर करण्यासंदर्भात विरोधकांनी आरोप केले. त्याला नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. कलम ३५६ चा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसच्या राजवटीत झाल्याचे ते म्हणाले. ईडी आणि सीबीआयसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्य सरकारांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोपही चर्चेदरम्यान विरोधकांनी केला होता.

त्यावर मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने इतिहास तपासून बघण्याची गरज आहे. आमच्यावर राज्य सरकारांना अडचणीत आणत असल्याचा आरोप होत असतो. पण कोणत्या पक्षाने या कलमाचा सर्वाधिक गैरवापर केला आहे, हे एकदा तपासून बघा.’ मी शरद पवारांचा खूप आदर करतो. त्यांचेही सरकार १९८० मध्ये काँग्रेसनेच पाडले. प्रत्येक प्रादेशिक नेत्याला त्रास देण्याची काँग्रेसच्या राजकारणाची पातळी आहे, असेही ते म्हणाले.

पं. नेहरू आणि इंदिरा गांधींनी हे केले…
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा आज मोदींनी पुन्हा एकदा उल्लेख केला. ‘काँग्रेसने एकूण ९० वेळा निवडून आलेली राज्य सरकारे पाडली. त्यात एकट्या इंदिरा गांधींनी ५० वेळा कलम ३५६ चा गैरवापर केला. केरळमध्ये डाव्या विचारसरणीचे सरकार निवडून आले. पण ते पं. नेहरूंना आवडले नाही आणि त्यांनीही सरकार पाडले,’ असे मोदी म्हणाले.

वैज्ञानिकांना बदनाम केले
काँग्रेसने भारतीय वैज्ञानिकांना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना देशाची चिंता नाही, फक्त आपल्या राजकीय भवितव्याची चिंता राहिली आहे, असा आरोप करत काँग्रेस हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विरोध करणारा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

Addressing the Rajya Sabha. https://t.co/XO3F8kfkfY

— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2023

PM Narendra Modi Speech in Rajyasabha Congress Allegation


Previous Post

पिंपळगाला बेशिस्त वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई; ग्रामपालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत…

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – गप्पूच्या पत्नीची प्रसुती

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - गप्पूच्या पत्नीची प्रसुती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group