इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याचा आपण कधी विचार करतो का?
कोणाच्या अंगी सचोटी अधिक, तर कोणामध्ये साधुत्व अधिक. कोणामध्ये शांतवृत्ती अधिक असेल, कोणी आपले जीवन निरुपद्रवी आहे. एवढ्यावरच संतुष्ट असेल. ठीक आहे. पण देवाच्या आपणाकडून वास्तविक काय अपेक्षा असतील, त्याने आपल्यासाठी सत्प्रवृत्तीच्या कोणकोणत्या क्षमता ठेवून दिल्या असतील आणि त्या मानाने आपले जीवन कोणत्या दर्जाचे ठरते याचा आपण कधी विचार करतो का?
तसा विचार तर अवश्य केलाच पाहिजे. कित्येक सत्-संकल्प आपण नेटाने पुरे न करता मध्येच सोडतो. कित्येक आदर्श दुर्लक्षितो. नित्यकर्मात कसूर करतो. प्रसंगी कुरकुरतो व त्रासतो. अशा गोष्टींकडे अधिक लक्ष पुरवून त्या सुधारण्यासाठी चिकाटीने आणि दीर्घकाल प्रयत्न चालविला पाहिजे.