इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल…
जेव्हा दुसरे कोणी तुम्हाला त्रास देतात, अपमान करतात, तेव्हा त्यासंबंधी सारखा विचार करून मनास गांजू नका. किंवा कोणाजवळ त्याची वाच्यता करू नका. कारण, नकोत अशा स्पंदनांना त्यायोगे तुम्ही वातावरणात सोडता. ‘त्यांनी निदान माझ्याशी तरी असे वागायला नको होते. काय हा उद्धटपणा, कृतघ्नपणा, अमर्यादा! आतां शहाणे, मोठे आणि सभ्य झालेत ना!’ अशाप्रकारची भाषा तुमच्या तोंडी नसावी. मनातही नसावी. यामुळे राग, द्वेष व मत्सर वाढवू नका. सर्वच जण प्रकृतीच्या आधीन असतात….
नम्र व्हा. क्षमावृत्ती अंगी बाळगा.