इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातच्या मोरबी शहरातील मच्छू नदीत तब्बल ४३ वर्षांनंतर पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. या घटनेने १९७९ च्या त्या भीषण दुर्घटनेच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. जेव्हा येथील मच्छू धरण फुटल्यामुळे हजारो लोक आणि जनावरे मृत्युमुखी पडली होती.
मच्छू नदीवर बांधलेला १०० वर्षांहून अधिक जुना केबल पूल (तरंगता पूल) रविवारी संध्याकाळी तुटल्याने १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दुरुस्तीनंतर हा पूल नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. दिवाळीची सुट्टी आणि रविवार असल्याने या पुलावर पर्यटकांची गर्दी होती. एका खासगी ऑपरेटरने सुमारे सहा महिने पुलाच्या दुरुस्तीचे काम केले. २६ ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला.
असा माजला होता हाहाकार
सुमारे ४३ वर्षांपूर्वी म्हणजेच ११ ऑगस्ट १९७९ रोजी गुजरातमध्ये मच्छू धरण फुटल्याने मोठी दुर्घटना घडली होती. सरकारी आकडेवारीनुसार या अपघातात एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, अनधिकृत आकडेवारीनुसार, या धरणाने २५ हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेतले होते. मृतांच्या संख्येत एवढी मोठी तफावत असण्याचे एक कारण असे म्हटले जाते की योग्य नोंदी किंवा कोणतीही ओळख प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी रोगांचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या सामूहिक कबरीत टाकण्यात आले होते. या दुर्घटनेने अनेकांच्या अंगावर आजही काटा येतो.
Gujrat Macchu River Major Accident 1979 Thousand deaths
Dam Burst