इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही!
तुमच्या हाती असलेले काम हे योग्य काय, अयोग्य काय हा विचार जागा ठेवून, गंभीरपणाने, शांत मनाने, उत्साहाने केलेत व मनाला कोणत्याहि रीतीने मलिन न होऊ देता ते केलेत, तर ते कर्म तुम्ही त्वरित परमेश्वरास अंतरीची देणगी म्हणून अर्पण करू शकाल. असे पूजनरूप कर्म करतांना कोणत्याहि मोबदल्याची अपेक्षा करण्याचे कारण नाही. कशाची भीती बाळगण्याचे कारण नाही. स्वभावधर्मानुसार हातचे काम आपण कसोशीने करीत आहोत या संतोषात तुम्ही रहाल व त्यायोगे जे काही तुम्ही बोलाल वा कराल त्यातून सत्याचाच आविष्कार तुम्ही निर्भयपणे करूं शकाल. एकंदरीत तुमचे अखिल जीवनच मुळी आनंदमय होईल. आणि हा आनंद असा असेल की, जगातील कोणीहि तो तुम्हापासून कधी हिरावून घेऊ शकणार नाही.