माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे १० जिल्हे वगळता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरी इतके किंवा मराठवाड्यात त्याहीपेक्षा खाली घसरणीमुळे रात्रीची थंडी जाणवत आहे. सदर १० जिल्ह्यात मात्र किमान तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने वाढल्यामुळे तेथे रात्रीची थंडी फारशी जाणवत नाही. मात्र, येत्या सोमवारपासून (१३ फेब्रुवारी) राज्याच्या हवामानात बदल होणार आहे.
दिवसाच्या कमाल तापमानात मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २ डिग्री वाढीमुळे असलेला ऊबदारपणा हा तसाच जाणवत आहे.
महाराष्ट्रातील सदर थंडीचे हे मिश्र वातावरण मागे सांगितल्याप्रमाणे रविवार दि.१२ फेब्रुवारीपर्यंत असेच असेल.
मात्र सध्या (दि.९-१०फेब्रुवारी) पश्चिमी प्रकोपामुळे ज. का.,लडाख, हि. प्र., उ. खण्ड मध्ये पडत असलेल्या बर्फ व पावसामुळेच आपल्याकडे सोमवार दि.१३ फेब्रुवारीपासुन महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते.
अर्थात दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात कोणतेही ढगाळ वातावरण, पाऊस, अथवा गारपीटीची शक्यता नाही. ह्याचीही नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी असे वाटते.
इतकेच!
Maharashtra Climate Weather Forecast Winter Cold