नागपूर – कोणतेही वाहन अत्यंत काळजीपूर्वक चालवावे लागते, परंतु तरीही काही वेळा अपघात घडू शकतो. आपल्या वाहनांचे नुकसान झाले तर त्यासाठी नुकसान भरपाई मिळू शकते. परंतु त्याकरिता आपल्या वाहनाचा इन्शुरन्स काढणे आवश्यक असते. परंतु काही वेळा इन्शुरन्स नाकारला जाऊ शकतो. त्याची काय कारणे आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक असते.
दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन चालवत असाल तर अपघातानंतर विम्याचा दावा करता येतो. कारण वाहन कुठेतरी खराब झाले तर विमा कंपनीकडे दावा करून नुकसान भरून काढू शकतो, त्याकरिता बाईक, स्कूटी, कार आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी विमा पॉलिसी केली जाते. मात्र सदर पॉलिसी घेतली असेल आणि या सात कारणांपैकी कोणतीही चूक केली असेल, तर तुमचा मोटार विमा दावाही नाकारला जाऊ शकतो. जाणून घेऊ या ही सात कारणे…
वैध परवाना नाही किंवा
अनेक वेळा असे दिसून आले आहे की, काही जण त्यांचे वाहन आवश्यकतेनुसार इतरांना चालविण्यास देतात किंवा त्यांच्या नातेवाईकांना चालविण्यास शिकवतात आणि त्यांच्याकडे एकतर ड्रायव्हिंग लायसन्स नसते किंवा ते वैध नाहीत, असे कळते. त्यामुळे अशा परिस्थितीत अपघात झाल्यास तुमचा विमा दावा नाकारला जातो. काही वेळा असे होते की, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते. यामुळे तुमचा विमा दावाही नाकारला जाऊ शकतो.
नावाचे हस्तांतरण
अनेक वेळा असे घडते की, जेव्हा एखादी सेकंड हँड कार किंवा वाहन खरेदी केले जाते आणि त्या वाहनाची आर सी त्या नवीन मालकाच्या नावे हस्तांतरित केली जाते, तेव्हा विमा दावा जुन्या मालकाकडेच राहतो. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या नावावर कार आहे, त्याला विमा मिळत नाही, परंतु ज्याच्या नावावर फक्त विमा आहे तो देखील त्यावर दावा करू शकत नाही. या कारणास्तव, वाहन खरेदी करताना विमा हस्तांतरण करणे आवश्यक आहे.
योग्य माहिती किंवा तथ्ये
तुमच्या कारमध्ये सीएनसी किंवा एलपीजी इन्स्टॉलेशन केले असेल, परंतु त्याची माहिती विमा कंपनीला दिली गेली नसेल. त्यामुळे या स्थितीत कंपनी मोटार इन्शुरन्स क्लेम केल्यावर नाकारते. तसेच अपघात इतर कारणाने झाला असेल. तरीही विमा कंपनीला सूचित करणे आवश्यक आहे.
कारचा व्यावसायिक वापर
बर्याच वेळा असे होते की, तुम्ही वैयक्तिक कार घेतली आहे आणि तुम्ही ती व्यावसायिक कारणांसाठी वापरत आहात, ही बाब पूर्णपणे विमा दाव्याच्या विरुद्ध आहे, तर अशा परिस्थितीत तुमचा विमा दावा नाकारला जातो. त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक वापरासाठी नोंदणी करावी लागेल.
दारू पिऊन चालवणे
अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यामुळे अपघात झाला आणि अशा परिस्थितीत तुम्ही मोटार विम्याचा दावा केला तर तुमचा विमाही नाकारला जातो.
त्वरित सूचना
वाहनाचे नुकसान झाल्यास 48 ते 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे लागते. जर तुम्ही विमा कंपनीला वाहन दुरुस्तीची माहिती दिली तर तुमचा विमा दावा नाकारला जाऊ शकतो.
निष्काळजीपणा
तुमच्या कारला अपघात झाला असेल आणि तुम्ही गाडी योग्य पध्दतीने चालवत नसाल आणि या काळात इतर कोणत्याही गोष्टीचे नुकसान झाले तर विमा कंपनी दावा भरणार नाही. तसेच, तुम्ही नो-पार्किंग झोनमध्ये कार पार्क केली असली तरी, दावा करता येणार नाही.