सुरगाणा – तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी धास्तावले असून शेतकऱ्यांची झोप उडाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात कापून रचून ठेवलेली भाताची गंजी पाण्यात भिजली आहेत तर शेतात कापून ठेवलेला भात पुर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भातशेती सह नागली , वरई व हरभरा ,मसुर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू,सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे अजुनही पावसाचे सावट कायम असुन पावसाची संततधार सुरूच आहे.शेतक-यांचे हातात आलेले पिक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे .बागाईत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन कष्टाने बहरलेला शेतीमाल मातीत मिसळल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात आला आहे. माता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरीचे खुप मोठे नुकसान झाले आहे.
मागिल वर्षी पिक विमा कंपनीने शेतक-यांकडून कोट्यावधी रुपये उकळून नुकसान भरपाई देण्याकडे पाठ फिरवली असुन केंद्र सरकारचे भक्क्म पाठबळ असलेल्या पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक केली आहे. यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा,करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातुन कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असतांना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावुन घेतला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे ट्रॅक्टर व मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असुन कर्ज व उसनवारी करून शेतक-याने कसेबसे ड्रिप,मल्चीन पेपर,खते,रोपे,मजुरी यासाठी पैसे ओतुन पुन्हा ऐकदा संकटातुन सावरण्यासाठी कंबर कसलेली असतांना निसर्गाचा कोप झाल्याने या अवकाळी पावसामुळे पुन्हा बळीराजाची कंबर मोडली आहे , बॅकांचे ,सहकारी संस्थांचे, फायनान्स चे व सावकारी तसेच हात उसने कर्ज गाड्यांचे बचत गटाचे हप्ते शेतकरी कसा फेडनार ? मुला मुलींचे लग्न , शिक्षण व ईतर मुलभुत गरजा कशा भागवणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसुल विभाग व कृषीविभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत.भात,नागली,वरई,उडीद,कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे.रब्बी हंगामातील हरभरा,कांदा रोपे, गहू हि पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पुर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून
पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.