दिडोरी : तालुक्यातील करंजवण धरण १०० टक्के भरले असून धरणातून कादवा नदीपात्रात ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून कादवा नदीपात्रलगत असणा-या ओझे , करंजवण, म्हेळूस्के, लखमापूर गावाना करंजवण धरण शाखाअभियंता भालके यांनी सावधाणतेचा इशारा देण्यात आला आहे. कादवा नदीपात्रालगत असणा-यां शेतकरी कुटूंबानी नदीपात्राकडे जाऊ नये गेल्या २४ तासात करंजवण धरणक्षेत्रात ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक चालू आहे.पाण्याची आवक लक्षात घेवून सोडलेले पाणी कमी जास्त करण्यात येणार आहे .२०१९ नंतर पहिल्यादां धरण १०० टक्के भरल्यांची माहिती करंजवण धरण शाखाअभियंता भालके यांनी दिली.