शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात रस्ते अपघातांची संख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. सध्या राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी सांगली , नाशिक, नागपूरमध्ये शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील माळशेज घाटात पिकअप आणि कारचा अपघात झाला होता. त्यानंतर आता शिवशाही बस व स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. लोणी बाभळेश्वर रोडवर झालेल्या या अपघातात ४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
ठिकठिकाणी खड्डे, रोडचे रुंदीकरण, पुलांचे बांधकाम यामुळे सर्वसामान्यांना जा- ये करण्यास मोठी अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे रोडचे काम सुरू असताना वनवे ट्राफीक असते, अशाच ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त दिसून येते. रस्त्यावरील वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. नगर जिल्ह्यातील लोणी गावात शिवशाही बस आणि स्कुलबसचा अपघात झाल्याची घटना घडली. शिवशाहीने स्कुलबसला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे . या अपघातात स्कुल बस मधील विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवशाही बस चालक खंदारे यांच्याकडून अपघात झाल्याची आरोप पालक वर्ग करत आहे. या अपघातानंतर लोणीचे पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
नागपूरमध्ये धावत्या शिवसाही बसला भीषण आग लागली होती. या आगीत बस जळून खाक झाली होती. या बसमधून १६ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते वाचले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक जवळ जळाल्याची दुर्घटना घडली होती, तर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये हडपसर – सासवड जवळएका कंटेनर आणि शिवशाही बस यांमध्ये जोरदार धडक होऊन या अपघातात एकजण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले होते.
विशेष म्हणजे राज्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाही त्यात यश मिळालेले नाही. गेल्या दोन वर्षांत राज्यात सुमारे ६० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात सुमारे २७ हजार प्रवासी व नागरिकांचा मृत्यू झाला. सन २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये वाढ झाली होती, तर २०२३ मध्ये गेल्या तीन महिन्यात राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर अपघात झाले विशेषतः समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांकावर आहे. म्हणूनच अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने पुढील महिन्यात मे मध्ये रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे.
नागपूर-अमरावती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग, कोंढाळी जवळील घटना, सर्व प्रवाशी सुखरूप#Nagpur #Amravati #ShivshahiBus #Fire #ViralVideo pic.twitter.com/nJH3Imvz7L
— Satish Daud Patil (@Satish_Daud) April 4, 2023
Shivshahi Bus Accident School Bus 4 Students injured