India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खुषखबर! खासगी कंपन्यांमधील लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

India Darpan by India Darpan
February 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे लाभ केंद्र सरकारकडून जाहीर होतात. मात्र खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी गेली तर साधे क्लेम करण्याचीही सोय नसते. खासगी कंपनीत काम करताना सुट्यांच्या बाबतीतही अनेक वेगळे नियम असतात आणि त्यात कुठलाही सरकारी लाभ होत नसतो. पण केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर करताना आता एक नवा नियम लागू केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच अर्थसंकल्प जाहीर केला. यात त्यांनी खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लीव्ह एनकॅशमेंटचा लाभ देणारा नियम जाहीर केला आहे. अर्थात हा नियम लागू करायचा की नाही, हे पूर्णपणे कंपनीवर अवलंबून आहे. मात्र बऱ्याच खासगी कंपन्या सरकारी नियमांचा अवलंब करीत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना नक्कीच लाभ मिळणार आहे. प्रत्येत खासगी कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला काही सुट्या देत असते. जसे कॅझ्युअल लिव्ह, सिक लिव्ह, पेड लिव्ह या सुट्या कर्मचाऱ्यांना मिळत असतात. काही सुट्या वर्ष संपल्यावर संपून जातात. मात्र काही सुट्या पुढील वर्षात जोडल्या जातात.

ज्यावेळी कर्मचारी नोकरी सोडून जातो त्यावेळी त्याला उर्वरित सुट्यांच्या मोबदल्यात पैसे मिळतात. केंर्दीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणात खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. त्या म्हणाल्या, ‘निमसरकारी पगारदार कर्मचाऱ्यांना अर्थात खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना रजेच्या रोख रकमेतील कर सवलतीचा लाभ ३ लाख रुपयांवरून २५ लाख रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने ही सुट ३० ते ३५ वर्षांपर्यंत वाढवली तर ती सुट वार्षिक २० हजार रुपयांपर्यंत जाते.’ या निर्णयामुळे खासगी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पण वास्तव वेगळेच
केंद्र सरकारने चांगल्या भावनेने हा निर्णय घेतला असला तरीही देशातील वास्तव वेगळेच आहे. बहुतांश खासगी कंपन्या नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी कशा रोखून धरता येतील, यासाठी प्रयत्न करतात. बरेच लोक कामगार न्यायालयात धाव घेतात, पण वर्षानुवर्षे चकरा मारण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या घोषणेचा किती लोकांना फायदा होतो, हे काळच सांगेल.

Private Company Employees Benefit Budget Announcement


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

पेटीएम पेमेंट्स बँकेने सादर केले ‘यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड’

Next Post

पेटीएम पेमेंट्स बँकेने सादर केले ‘यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड’

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group