नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाची संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ८ धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी ३ वाजता ५०० क्युसेक्स तर उद्या सकाळी ६ वाजता १ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल, असे विभागाने कळविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील खालील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग असा (क्युसेक्समध्ये)
दारणा – ८७१८
मुकणे – १०८९
कादवा – २२५०
वालदेवी – १८३
आळंदी – ३०
भोजापूर – १९०
गंगापूर – ५००
नांदूर मध्यमेश्वर – १९,९४३
पालखेड – १०,८८१
Nashik District Rainfall Dam Water Discharge