नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या मेन रोडवरील एका मोबाइल डिलर्सविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डिलर्सने सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी मेन रोडवरील वावरे लेनमधील ईगल इलेक्ट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.चे संचालकांविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यावसायिकांकडून घेतली. पण, ऑगस्ट महिन्यात मोबाईलचा पुरवठा केला नाही. त्यानंतर सतत पाठपुरावा केल्यानंतर खेमानीकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यानंतर. औरंगाबादच्या व्यावसायिकांनी मोबाइल कंपनीकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगितले.