नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ येथील संभाजी चौक भागात घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या अंगठीसह साडेपाच लाखाची रोकड लंपास केली. या प्रकरणी रत्नाकर पांडूरंग शेळके (५१ रा. ओमकारनगर, किशोर सुर्यवंशी मार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ गावातील संभाजी चौकात ही घटना घडली. १ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी शेळके यांच्या वडिलांच्या उघड्या घरात शिरून कपाटात ठेवलेली साडे पाच लाखाची रोकड आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ५ लाख ९० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.