मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नुकत्याच झालेल्या १६ नगरपंचायतींची निवडणूक, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक तसेच, १५ नगरपंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित नशिब आजमावले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी भाजप विरोधात निवडणूक लढविली. आता याच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीने ठोस निर्णय घेतला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकत्रित एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितरित्या लढविण्याचा निश्चय केला आहे. महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून यावेत, असे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिन्ही पक्षांच्यावतीने करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेले पत्रक असे