मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोणतेही जेवणात कितीही चविष्ट आणि रुचकर असले पण त्यात मीठ नसेल तर? मीठाशिवाय कोणताही पदार्थ अपूर्ण असतो. मीठ आपल्या जेवणाला चवदार तर बनवतेच पण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. आपल्या जेवणाची टेस्ट चांगली करण्यासोबत मीठ खूप फायदेशीर ठरते. मिठाचे त्वचेवर होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? मीठ केवळ त्वचेलाच फायदा देत नाही तर तुमचे मन मोकळे करण्यासही मदत करते. म्हणजेच मीठ केवळ तुमचे सौंदर्य वाढवणार नाही आणि त्याचबरोबर समस्याही दूर होतील. यासाठी तुम्हाला फक्त आंघोळ करताना पाण्यात मीठ मिसळावे लागेल. काही आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या या टिप्सद्वारे फक्त 15 मिनिटांत चमकणारी त्वचा मिळवा.
अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकल्याने त्वचा खोलवर स्वच्छ होते. मीठ त्वचेतील मृत पेशी चांगल्या प्रकारे काढून टाकते आणि त्वचा चमकू लागते.
तेलकट केसांचा त्रास होत असेल तर पाण्यात मीठ मिसळून केस धुवा. यामुळे तुमच्या तेलकट केसांची तक्रारही दूर होईल आणि त्याचबरोबर केसांना चमक येईल. तेलकट त्वचेसाठीही मीठ पाणी खूप फायदेशीर आहे.
स्नायू वारंवार दुखत असतील तर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ नक्कीच करावी. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. यासोबतच सांधेदुखीतही आराम मिळतो.
इन्फेक्शन किंवा खाज येण्यासारखी त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आराम मिळेल. मीठामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे त्वचेचे संक्रमण दूर होते.
जर चेहऱ्याला लगेच चमक हवी असेल तर आंघोळ करताना पाण्यात दोन चमचे मीठ टाका. यामुळे त्वचा तर उजळ होईलच, पण तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा मुरुमांचे डाग असतील तर तेही हळूहळू जातील.