मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुंवाधार परफॉर्मन्स देऊन टीम इंडियाला विजय मिळवून देणारे क्रिकेटपटू काही काळानंतर बॅड परफॉर्मन्समुळे चर्चेत येतात. अगदी कपील देव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड अशी कितीतरी नावं देता येतील. शेवटच्या काळात या खेळाडूंचा परफॉर्मन्स अपवादानेच एखाद्या सामन्यात झळकला असेल. तेच आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बाबतीत होणार आहे, असे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत.
राहुल द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून चक्क १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचं खापर अनेकांवर फोडण्यात आलं. पण त्याचा भार विशेषतः रोहित आणि विराटवरच येणार होता. कारण या दोघांकडून सर्वाधिक अपेक्षा व्यक्त होत असतात. त्यानंतर टी-२० मध्ये सध्या श्रीलंकेविरुद्ध हार्दिक पांड्या टीम-इंडियाचं नेतृत्व करतोय. रोहित आणि विराट कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
द्रविड काय म्हणतो?
टी-२० वर्ल्डकपमध्ये संघात असलेले फक्त तीन-चार खेळाडूच सध्या श्रीलंकेविरुद्ध खेळत आहेत. बाकी सगळे युवा खेळाडू आहेत. यापुढे वर्ल्ड कप आहे, कसोटी वर्ल्ड कप आहे, त्यादृष्टीने बीसीसीआय वेगळा विचार करत आहे, असे द्रविड म्हणाला. युवा खेळाडूंवर विश्वास ठेवल्यास वेगळे परिणाम हाती लागू शकतात, असे संकेतही द्रविडने दिले.
अनेकांचे भवितव्य धोक्यात
टी-२० वर्ल्डकपनंतर फक्त चारच खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळवीणे ही इतर खेळाडूंसाठी धोक्याची घंटा आहे. कारण पुढे कसोटी वर्ल्डकपसाठी भलेही अनुभवी खेळाडू राहतील, पण एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक आणि इतर मालिकांमधून जुन्या खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Indian Cricket Team Virat Kohli Rohit Sharma Rahul Dravid
T20 Sports