माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
..
उष्णतेची लाट
संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर अश्या २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे ४० ते ४४ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे राहून आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार २५ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते, असे वाटते.दरम्यानच्या पाच दिवसात गुजराथ राज्य व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. विशेषतःह्या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, असे वाटते.
अवकाळीची शक्यता कायमच-
उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.२५ मे पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असुन गुरुवार, शुक्रवार, दि.२३ व २४ मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या ह्या ८ जिल्ह्यात अवकाळीची शक्यता अधिक जाणवेल. मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात मात्र शुक्रवार दि.२४ मे पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथे मात्र २४ मे नंतरही वातावरण टिकून राहील.
मान्सूनचा वेग कायम तर चक्रीवादळही डोकावतेय!
रविवार दि.१९ मे ला अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट व्हावयाचे आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.