पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात वाढत्या संसर्गजन्य आजारांमुळे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे आवश्यक असते. यासाठी हिरव्या पालेभाज्यांवर भर दिला जातो, हिरव्या पालेभाज्या हा नेहमीच निरोगी आहार योजनेचा एक भाग असतो. हिरवी पालक भाजीच्या उच्च पौष्टिक सामग्रीमुळे, ही सर्वात आरोग्यदायी भाजी मानली जाते. पण पालक हे आरोग्यदायी आहे का? काही घरात तर महिला आपल्या पतींना मुलांना सक्तीने पालकाची भाजी खाऊ घालतात. याचा अर्थ असा नाही की, ती भाजी तुम्ही तिन्ही वेळा खावे का ? कारण कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन शरीराला हानी पोहोचवते, तसेच काही हिरव्या भाज्यांच्या बाबतीतही असेच आहे. त्यामुळे याचे सेवन योग्य पद्धतीने करावे, जेणेकरून शरीराला फायदा होईल. पालकाची आपण भाजी आणि काढा बनवू शकता, तसेच सूपमध्ये किंवा ऑम्लेटमध्ये घालून शिजवू शकता.
पालकाला सुपरफूड म्हटले जाण्याची अनेक कारणे आहेत, कारण त्यात कॅलरीज कमी आहेत, निरोगी पोषक तत्वांनी भरलेले आहे आणि आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्त्वे ए, सी आणि के सारख्या आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
आपल्या आहारात हे सुपरफूड नियमितपणे समाविष्ट केल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, चांगले आरोग्य राखण्यास, वजन कमी करण्यास आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. पालकामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने ते मधुमेह नियंत्रणातही मदत करू शकते.
आहार किंवा जेवणात पालकाची छोटी वाटी भाजी रोज खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचत नाही. तथापि, जर तुम्ही दररोज यापेक्षा जास्त पालक खाल्ले तर तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते, हे वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे संयुग असते. जेव्हा शरीरात या संयुगाचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त होते, तेव्हा शरीराच्या इतर खनिजे शोषण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ लागतो. ऑक्सॅलिक ऍसिड जस्त, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमशी बांधले जाते ज्यामुळे खनिजांची कमतरता होऊ शकते.
जर पालकाचा काढा (डेकोक्शन ) जास्त प्रमाणात प्यायले तर ते आरोग्याला हानी पोहोचवेल, तसेच या हिरव्या पालेभाज्यामध्ये हिस्टामाइन असते, हे रसायन शरीराच्या काही पेशींमध्ये आढळते ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये किरकोळ अॅलर्जी होऊ शकते.
पालक एकाच वेळी किंवा दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. पालकमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या म्हणजे गॅस होणे, पोट फुगणे, पेटके येणे असे होऊ शकते.