मुंबई/पुणे/नाशिक (इंडिया दर्पण वृतसेवा) – एकीकडे महागाईचा भस्मासूर वाढत असतानाच काही प्रमाणात सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळावा म्हणून गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आता सरकारने कच्च्या पामतेलावरील प्रभावी सीमाशुल्क ५.५ टक्क्यांवर आणले आहे. या निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होण्यास आणि ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आता क्रूड पाम तेलावर ५ टक्के आकारला जाईल, आतापर्यंत ७.५ टक्के होता. या कपातीनंतर कच्च्या पाम तेलावरील प्रभावी सीमाशुल्क ८.२५ टक्क्यांऐवजी ५.५ टक्के होईल. काही व्यापाऱ्यांच्या मते, या कपातीमुळे भाव २८० रुपये प्रति क्विंटलने कमी होऊ शकतात. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्येही सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली होती. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत देशभरात खाद्यतेलाच्या किरकोळ किमती जागतिक बाजाराच्या अनुषंगाने जास्त आहेत, पण ऑक्टोबरपासून त्यामध्ये घसरण होत आहे. एकंदरीत या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मागील वर्षी दिवाळी सणाच्या नंतर तत्कालीन किमतींच्या तुलनेत शेंगदाणे आणि मोहरीच्या तेलाच्या किरकोळ किमती १.५० ते ३ रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत, तर सोया आणि सूर्यफूल तेलाच्या किमती आता ७ ते ८ रुपये प्रति किलो दराने खाली आल्या आहेत.
नवीन वर्षात बजेट सादर करण्यापुर्वी यंदा जानेवारी महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सरकारने पाम तेलावरील आयात शुल्कात प्रती टन ८००० रुपयांची म्हणजेच११२ डॉलरने कपात केली आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचना जारी केली आहे. ज्यात क्रूड पाम तेलाचे आयात शुल्क ८६ डॉलर प्रती टनामागे कमी करण्यात आले आहे. या कपातीनंतर एक टन क्रूड पाम तेलावर आता ११३६ डॉलर शुल्क आकारले जाणार आहे.
क्रूड सोयाबीन तेलाच्या आयात शुल्कात देखील सरकारने प्रती टन ३७ डॉलरची कपात केली असून ते १४१५ डॉलर केले आहे. पाम तेलावरील आयात शुल्क ११२ डॉलरने कमी होऊन ११४८ डॉलर प्रती टन झाले आहे. आयात शुल्कात कपातीमुळे तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. भारतात दरवर्षी एकूण गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात होते. हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. यामुळे तीन महिने आधी सरासरी ११० ते १२५ रुपयांदरम्यान असलेले खाद्यतेल आता १४०-१६० रुपयांच्या घरांत गेले आहे. सध्या खाद्यतेलाची आयात घटली आहे. सध्या नवी दिल्लीत सध्या पाम तेलाचा भाव प्रती लीटर १२० ते १३० रुपये आहे. सोयाबीन तेलाचा भाव १३० ते १४० रुपये आहे. सनफ्लॉवर तेलाचा भाव १४० ते १५५ रुपये आहे. तर शेंगदाणा तेलाने १६०ते १८० रुपयांची पातळीवर आहे.
नाशिक येथील किराणा बाजारातील खाद्यतेलाच्या किमतीबाबत माहिती घेतली असता स्थानिक दुकानदारांनी सांगितले की, सोयाबीन तेल 133 ते 135 रूपये, शेंगदाणा तेल 160 ते 165 रुपये, सूर्यफूल तेल 140 ते 150 रुपये, पामतेल 125 ते 128 रुपये असा सर्वसाधारण दर आहे. या दरांमध्ये साधारणत : आठवड्याला एक ते तीन रुपयाचा फरक पडतो, असे ही अशी माहिती राजेश्वर किरणाचे मालक विशाल सोनवणे यांनी दिली. म्हणजे अद्याप तेलाचे दर कमी झाले नसले तरी कदाचित दर कमी झाल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल असेही दुकानदार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अलीकडेच केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवणुकीची मर्यादा ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हे स्पष्ट करा की स्टोरेज मर्यादा आदेश केंद्र सरकार आणि सर्व राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवण, वितरणाचे नियमन करण्याचे अधिकार देतो. यामुळे देशातील खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल.