सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाचे निर्बंध पाळून केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यांचा यात्रोत्सव पार पाडण्याचे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी ग्रामस्थांना केले. सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या नियोजनार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक रावसाहेब त्रिभुवन, सरपंच योगेश घोटेकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत थोरात, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक राऊत, देवस्थान संस्थांचे विश्वस्त अशोक चव्हाण, दीपक खुळे, रमेश खुळे, शरद खुळे, वीज वितरणचे अभियंता आर. आर. येवले, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एम. एस नाठे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. सोळंके उपस्थित होते.
हा यात्रोत्सव मंगळवार (दि.15) पासून सुरू होणार असल्याने यात्रा होणार की नाही असा संभ्रम ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना पडला होता. बैठकीत तहसीलदार कोताडे यांनी सांगितले की, कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना आपण सर्व करत आहोत. राज्य शासनाने 8 जानेवारीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमास केवळ 50 लोकांना परवानगी असल्याने आपण त्यानुसार केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर, मास्कचा वापर करत यात्रोत्सव पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी महेंद्र काळे, शैलेश खुळे, कैलास गोसावी, दिनकर खुळे, किशोर खुळे, पंढरीनाथ खुळे, प्रकाश खुळे, योगेश गिते, योगेश काळे, पप्पू खुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सोळंके यांनी प्रास्ताविक केले. दीपक खुळे यांनी आभार मानले. कोरोनाच्या लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल असे त्यांनी सांगितले. यात्रा पटांगणात कोणतेही दुकाने न लावण्याची सूचना यावेळी त्यांनी केल्यात. मंदिर परिसरात सॅनिटायझर उपलब्ध करण्यात यावे. व वारंवार त्याचा वापर करावा. तसेच लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या भाविकांच दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. कोणत्याही आस्थापनामध्ये प्रवेश करतांना मास्क अनिवार्य आहे