अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या सुरगाण्यांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून, नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. २०२२ मध्ये जामुनपाडा गावाला जोडणाऱ्या तान नदीवर कमी उंचीचा पुल निष्कासित करून नवीन पुलाचे काम चालु केले होते. परंतु ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे जामुनपाडा- खांदुर्डी गावातील ग्रामस्थांना बाजार, दवाखाना,शाळेत व इतर अत्यावश्यक सेवेसाठी पुराच्या पाण्यातून असे शर्तीचे प्रयत्न करून नदी पार करावी लागत आहे. पाऊस कमी होताच नदीवर अपूर्ण असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.