सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कर्णधारपदावरून हटविल्यानंतरही विराट कोहलीला होणार हे फायदे

by Gautam Sancheti
डिसेंबर 12, 2021 | 2:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
virat kohli

 

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने विराट कोहलीच्या जागी सलामी फलंदाज रोहित शर्माला टी-२० नंतर एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. कोहलीने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोहलीची इच्छा नसतानाही बीसीसीआयने त्याला एकदिवसीय सामन्यांमधून कर्णधारपदावरूनही हटविले. विराट आता फक्त कसोटी सामन्यांमध्येच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर फॅन्सचा संताप पहायला मिळाला आहे. परंतु बीसीसीआयच्या या निर्णयामुळे विराटला खुप सारे फायदे होणार असल्याची बाब पुढे आली आहे.

क्रिकेट खेळताना तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये (एकदिवसीय, टी२० आणि कसोटी) कर्णधारपद भूषविणे कठीण कामांपैकी एक असते. केवळ एकाच प्रकारच्या सामन्यामध्ये कर्णधार राहिल्याने विराटवर अतिरिक्त दबाव राहणार नाही. म्हणजेच, त्याला कसोटी सामन्यांवरच चांगले लक्ष केंद्रित करता येईल, हे पहिला आणि मोठा फायदा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विराट हा फलंदाजी करताना मोठ्या धावा करु शकलेला नाही. अनेकदा तो संघर्ष करताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये विराट दोन वर्षात एकही शतक करू शकला नाही. हे प्रथमच पाहायला मिळाले आहे. कर्णधारपदाचा भार उतरल्यानंतर तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे. ही सर्वात महत्त्वाची आणि त्याच्यासाठी फायद्याची बाब आहे. याद्वारे तो फलंदाजीत आपले कर्तृत्व अधिक सिद्ध करेल आणि अनेक विक्रम नावावर करु शकेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आयुष्यात अनेक आव्हाने असतात. कोरोना महामारी आणि जीवसुरक्षा प्रणालीत राहिल्याने यामध्ये आणखी भर पडली आहे. त्यामुळेच क्रिकेटपटू शारिरीक आणि मानसिकरित्या थकत आहेत. त्यांना कुटुंबीयांना अधिक वेळ देता येत नाही. फक्त एका फॉरमॅटमध्ये नेतृत्व केल्यास विराटला आराम मिळेल. त्यामुळे तो पहिल्यापेक्षा कुटुंबीयांना अधिक वेळ देऊ शकेल. परिणामी, त्याची पत्नी अनुष्का आणि कन्या वामिका यांच्यासोबत विराट राहू शकणार आहे. यातूनच त्याचा मानसिक तणाव दूर होणे आणि पुढील खेळांवर अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होणार आहे. म्हणजे, कुटुंबाला वेळ देणे आणि तणाव व थकवा दूर करणे यासाठीही त्याला फायदा होणार आहे.

विजयात विराटच सरस
विराटची कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यातील विजयाची टक्केवारी ७०.४३ राहिली आहे. दहा सामन्यात भारताचा कर्णधार राहिलेल्या कोणत्याही खेळाडूपेक्षा ही विजयाची सर्वोत्तम टक्केवारी मानली जात आहे. भारतीय संघासाठी विराटने ९५ सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. त्यापैकी ६५ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. भारतासाठी कोहलीपेक्षा अधिक सामने महेंद्र सिंह धोनी (११०), मोहम्मद अझरुद्दीन (९०) आणि सौरव गांगुली (७६) यांनी जिंकले आहेत. कोहली नेतृत्व करताना भारताने १९ पैकी १५ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. यामध्ये दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि वेस्टइंडिजमधील विजयाचा समावेश आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दया भाभी नंतर आता टप्पूचाही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला रामराम?

Next Post

नाशिक – शस्त्राचा धाक दाखवून ६४ डुक्कर पळवले; दरोड्याचा गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
fir.jpg1

नाशिक - शस्त्राचा धाक दाखवून ६४ डुक्कर पळवले; दरोड्याचा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011