गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हापूस एवढा महाग का झालाय? ही आहे फळमाशी…

by Gautam Sancheti
मे 22, 2022 | 7:27 pm
in इतर
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

हापूस एवढा महाग का झालाय?
ही आहे फळमाशी…

यंदा हापूस आंबा महाग असल्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ऐरवी साधारण ५० ते ६० रुपयांना मिळणारा हापूस यंदा थेट १०० ते १५० रुपयांना विक्री होत आहे. ही भाववाढ नेमकी कशामुळे आहे, त्याचा घेतलेला हा मागोवा…

भालेराव e1600854523672
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880

हापूस आंबा महाग असण्यामागे आहे ती फळमाशी. या माशीने यावर्षी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे…ही माशी झाडावर आंबा कच्चा असताना त्यावर बसून आपल्या नांगीने आंब्याच्या वरच्या हिरव्या आवरणात बारीकसे छिद्र पाडून त्यात असंख्य अंडी सोडते…हे छिद्र वरून डोळ्यांनी पाहिलं तरी दिसत नाही…आंबा उतरवला आणि तो पिकायला ठेवला की जसा जसा आंबा पिकत जातो तसतसा त्यावर एक बारीकसा काळा डाग दिसू लागतो…आंबा पिकत चालला की हा डाग मोठ्ठा होत जातो आणि त्यातून मग आळी बाहेर पडते…आणि आंबा फेकून द्यावा लागतो…

माझ्या मागच्या आठवड्यातील कोकण ट्रीप मध्ये मी कोकणातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सड्यावर आंब्याच्या बागांना भेटी दिल्या आणि प्रत्यक्षात त्यांचे काम पाहीले आहे…आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत… यावेळी आंबा उत्पादक शेतकरी याकारणाने अगदी हवालदिल झालेला आहे…

आंब्याचा खरा सिझन सुरू होतो मार्च नंतर आणि नेमकं त्याचवेळी वादळी पाऊस पडला आणि बरेचसे आंबे जमिनीवर गळून पडले आणि या गळून पडलेल्या कच्च्या आंब्यावर या माशीने अंडी घालून मोठ्या प्रमाणात पैदास केली त्यामुळं नुकसान प्रचंड झालं आहे…

या माशीवर कोणताही जालीम उपाय नाही…हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ट्रॅप लावला जातो ज्यात मुख्यतः नर अडकला जातो आणि मरतो…जास्तीत जास्त फळमाशीचा नर मारला गेला की आपोआप फळमाशीच्या प्रजनन क्षमतेवर प्रतिबंध यावा हा त्यामागचा उद्देश… काही प्रमाणात हे यशस्वी होतय पण त्यासाठी हा प्रयोग सगळ्याचं शेतकऱ्यांनी करायला हवा…एका शेतात केला आणि बाजूच्या शेतात हे ट्रॅप लावले नाही तर काहीही उपयोग होत नाही कारण बाजूच्या शेतातली नर-मादी एकत्र येऊन त्यातली फळमाशी ट्रॅप लावलेल्या शेतात येतेच आणि ती या ट्रॅप मध्ये अडकत नाही…

या एका कारणाने यावेळी आंब्याच्या उत्पादनात खूप मोठा परिणाम झालाय…आणि त्यावर शेतकरी काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे… ‘आंबा खराब निघाला, आंबा किडका निघाला…यावेळी आमच्या आंबा चांगला नव्हता… ‘ वगैरे वगैरे आपण सहज म्हणतो पण त्यामागची परिस्तिथी जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न…

अनेक आंब्याच्या बागांना, तिथल्या व्यापारी लोकांना, मजुरांना, शेतकऱ्यांना भेटल्यावर खूप माहिती मिळाली…आपल्या ताटात आमरस म्हणून वाटीत येणारा हा आंबा अनेक खडतर प्रवास केल्यानंतर घरी पोहोचतो… मोहोर आला, कैऱ्या आल्या, आंबा झाडाला लागला, तो तोडला अन् विकला इतकं ते सोपं नाही…आंबा सिझनचे काम केवळ तीन चार महिनेचं असेही नाही…वर्षभर प्रत्येक कलमाची, झाडाची व्यवस्थित देखभाल, निगा राखल्यावरचं सिझन मध्ये आपल्याला आंबा बघायला मिळतो…

जुन महिन्यापासूनच त्यावर काम करायला सुरुवात होते… सिझन संपला की पालापाचोला गोळा करायचा…बाग साफसूफ करायची… कलमाभोवती आळे करून हा पालापाचोला त्यात टाकायचा आणि कपोस्त खत तयार करायचं… एवढच नव्हे तर वेळोवेळी लेंडी खत आणि अनेक प्रकारची खतं टाकायची…मग वेगवेगळ्या फवारण्या…ऑक्टोबर पासूनच त्या सुरू होतात…त्यांचा खर्चही खूप असतो… साधारण एका लिटरला पाच ते सहा हजार खर्च येतो…

एक किडा असा आहे की जो मोहोर लागताचं त्या मोहोराच्या मुळाशी छोटंसं छिद्र करून आत घुसतो आणि तो सगळा मोहोर आतून पोकळ करून टाकतो… मोहोरच संपवला की मग आंबा कसा येणार?… त्यावरही मग काम करावं लागतं…

बरं आंबा आला की मग तो काढायचा खर्च ही खूप आहे…सिझन असल्याने लेबर कॉस्ट अचानक खूप वाढते… कोकणातला आंबा हा बहुतांश कातळावर आणि डोंगर उतारावर असल्याने आंबा उतरवणे हे कमालीचे कष्टाचे काम आहे… बरं आंबा उतरलवा तरी एक एक पाटी किंवा तो आंब्याने भरलेला जड क्रेट डोक्यावर घेऊन सगळा चढ चढून रस्त्यावर आणणे किंवा घरात आणणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे…घरात आणला की त्याची वर्गवारी करणे… त्यातला चांगला वाईट शोधणे… ऑर्डर प्रमाणे तो वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक करणे…आलेल्या ऑर्डर प्रमाणे transport शोधून तो त्या गाडीत पुन्हा स्वतःच उचलून पाठवणे हे मोठे काम आहे…

आपण आंब्याची पेटी उघडली आणि त्यात काही आंबे खराब निघाले की फोन उचलतो आणि लगेच तक्रार करतो…बहुतांश आंबा शेतकरी त्यासाठी आधीच दोन चार आंबे पेटीत जास्त तरी टाकतात किंवा आपल्याला त्याबदल्यात पैसे किंवा आंबे देऊ करतात…

बरं आंब्याला भाव मिळतो तो फक्त सुरुवातीच्या काही दोन तीन आठवडयात… अक्षय तृतीया झाली की भाव पडतात आणि मग उत्पादन खर्चा इतकेही पैसे मिळणे मुश्किल होऊन जाते… पडलेल्या भावामुळे आंबा उतरवणेही परवडत नाही…
अशा अनंत अडचणीतून मार्ग काढत हा फळांचा राजा आपल्या घरात येत असतो…
‘हापूस उगाचंच खूप महाग आहे?… एवढे पैसे कशाचे?…यावेळी आंबा खूपच महाग आहे…’ असे म्हणण्याआधी त्याची दुसरी बाजूही समजून घ्यावी म्हणून हा शब्द प्रपंच…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

त्र्यंबकेश्वर येथे हरिनामाच्या जयघोषात श्रीनिवृत्तीनाथ महाराज मंदिरावर सुवर्ण कळस स्थापन

Next Post

नाशिक – रिक्षा प्रवासात सहप्रवासी महिलेने वृद्धेकडील सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय

सप्टेंबर 17, 2025
Untitled 23
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी शासकीय योजना आणि व्यवसायाच्या संधी विषयावर सेमिनार…

सप्टेंबर 17, 2025
Next Post
crime diary 1

नाशिक - रिक्षा प्रवासात सहप्रवासी महिलेने वृद्धेकडील सोन्याचे दागिने व रोकड केली लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011