मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर सावधान. कारण तुम्हाला वाहतूक नियम पाळणे बंधनकारक आहे. जर तुम्ही ते पाळले नाही तर थोडाथोडका नाही तर तब्बल २३ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. हो, तुमचा यावर विश्वास बसत नसेल पण हे खरे आहे. तसे कसे हेच आता जाणून घेऊया
वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे, असे करण्यात आपण अयशस्वी झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. आपल्या निष्काळजीपणामुळे तुमच्यासोबतच इतर कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला नेहमी जबाबदारीने वाहन चालवण्याचा सल्ला दिला जातो. आपण वाहतूक नियमांचे पालन केले नाही आणि नवीन वाहतूक नियमांनुसार मोटरसायकलचे सुमारे २३ हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्याबद्दल सुमारे ५ हजार रुपये दंड, नोंदणी प्रमाणपत्राशिवाय (RC) वाहन चालवल्याबद्दल ५ हजार रुपये चलन, विमाशिवाय २ हजार रुपये चलन, पियुसी म्हणजे वायू प्रदूषण मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल १० हजार रुपये दंड आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल तुम्हाला लागू शकते. १ हजार रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल.
सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन वाहतूक नियम लागू करण्यात आले होते. त्यावेळी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करताना एक वाहनचालक दिनेश मदान यांचे २३ हजार रुपयांचे चलन कापण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी घरून वाहनाची कागदपत्रे मागवली आहे, असे सांगितली लागले, मात्र तोपर्यंत हरियाणा वाहतूक पोलिसांनी त्यांचे चलन कापले. याबाबत दिनेश मदन सांगतात की यावेळी त्यांच्या स्कूटरची (स्कूटी) एकूण किंमत फक्त १५ हजार रुपये होती. वाहतुकीचे नियम पाळा नाहीतर तुमच्यासोबतही असे होऊ शकते.
तसेच नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी वाहनांवर चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाची तिसरा प्रवासी (तिसरी सवारी ) म्हणून गणना केली जाईल. अशा परिस्थितीत जर आपण, मुलगा आणि पत्नीसह दुचाकीवर बसणार असाल आणि मुलाचे वय चार वर्षांपेक्षा जास्त असेल तर नियमाचे उल्लंघन केल्यास १ हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते किंवा दंड होऊ शकतो.