मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन अवघा दीड महिना लोटला असताना आता पुन्हा नवा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी शिवसेना पक्ष फुटला. सेनेचे ४० आमदार फुटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवा गट स्थापन केला. आता काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या पक्षाचे आमदार आता सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे.
राजकारणात कधी काहीही होऊ शकते असे म्हणतात. सध्या तसेच वातावरण राज्यात दिसते आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाल्यानंतर आता पुन्हा नव्या हालचालींना वेग आला आहे. दीड महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्याची झलक पहायला मिळाली आहे. काँग्रस आमदारांनी पैसे घेऊन भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. यासंदर्भात पक्षांतर्गत अहवाल तयार करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यातच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जाते. ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्याही वार्ता आहेत. याच अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अनेक आमदार आता फुटणार असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व जण भाजपमध्ये जाणार, शिंदे गटात जाणार की नवा गट स्थापन करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Again Political Crisis in Maharashtra Chances
Congress MLA BJP Shinde Group Politics