India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केजरीवाल सध्या विविध नेत्यांच्या भेटी का घेत आहेत? भाजपसाठी अशी आहे त्यांची रणनिती

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचा प्रश्न सुटताना दिसत नाही. एकीकडे केंद्र सरकारने अध्यादेश आणून सुप्रीम कोर्टाचा निर्णय उलटवला तर दुसरीकडे अरविंद केजरीवालांच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आघाडी उघडली आहे. याचाच एक भाग म्हणून ते विविध पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत.  जाणून घेऊया केंद्र सरकारच्या या अध्यादेशाचे पुढे काय होणार? केजरीवालांचे नियोजन काय? भाजप सरकारला ते अवघड कसे? केजरीवालांची नक्की रणनिती कशी आहे याविषयी…

सर्वोच्च न्यायालयात धाव
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या बाजूने निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यांना आपले स्थान जनतेमध्ये टिकवायचे आहे. केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टी ११ जून रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य रॅली काढून आपली ताकद दाखवणार आहे. मेगा रॅलीमध्ये विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. गोपाल राय म्हणाले की, केंद्र सरकारने ज्या प्रकारे संविधानाची खिल्ली उडवली आहे, त्याविरोधात ही रॅली आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1660192519907602432?s=20

संसदेत अध्यादेश आणि रणनिती
अरविंद केजरीवाल हे संसदेतील अध्यादेशाविरुद्ध सध्या मेहनत घेत आहेत. हा अध्यादेश कायदा म्हणून चालू ठेवण्यासाठी केंद्र सरकारला सहा महिन्याच्या आत संसदेतून तो मंजूर करावा लागेल. भाजपकडे सध्या लोकसभेत पूर्ण बहुमत आहे. मात्र, राज्यसभेत अडचणी नक्कीच निर्माण होऊ शकते. आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या २४५ आहे. दोन नामनिर्देशित सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. तेथे भाजपचे ९३ सदस्य आहेत. इतर मित्रपक्षांच्या सदस्यांचा समावेश केला तर भाजपला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांची संख्या ११० होईल. अध्यादेश काढण्यासाठी केंद्र सरकारला राज्यसभेतील १२० सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. म्हणजे त्यासाठी पक्षाला विरोधी पक्षाच्या १० सदस्यांची गरज भासणार आहे. याआधी दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती झाली तरी कायदा चालू ठेवण्यासाठी आणखी ८ सदस्यांची गरज भासणार आहे.

केजरीवाल यांचा पाठिंबा 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश जारी केल्याने अरविंद केजरीवाल भडकले. तेव्हापासून ते सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. २१ मे रोजी नितीश कुमार यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. नितीश यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला. तेव्हा केजरीवाल म्हणाले होते की, केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात हा अध्यादेश विधेयक आणला आणि सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अंत होईल.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1661692514787786752?s=20

बिहारचे मुख्यमंत्री नितीश यांनी या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. केजरीवाल यांनी २३ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. भेटीनंतर दोघांनी एकत्र मीडियाशी संवाद साधला. केजरीवाल यांनी २४ मे रोजी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा आणि दिल्लीचे मंत्री आतिशी होते. केजरीवाल यांनी २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सर्वांनीच केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1661288600468701184?s=20

AAP Delhi CM Arvind Kejriwal Strategy Politics


Previous Post

वयाच्या साठाव्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थी बोहोल्यावर… कोण आहे रुपाली बरुआ? अशी आहे त्यांची लव्ह स्टोरी

Next Post

गुंगीचे औषध देऊन कारचालकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…. या गुन्ह्यांचा झाला उलगडा… नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी…

Next Post

गुंगीचे औषध देऊन कारचालकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.... या गुन्ह्यांचा झाला उलगडा... नाशिक पोलिसांची मोठी कामगिरी...

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षण विभागाचा आणखी एक सावळा गोंधळ; आता गणवेशावरुन काढले हे आदेश

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group