येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील रायते-चिचोंडी रस्त्यावरील विट भट्टीचे काम करणारे उपाध्ये कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. उपाध्ये यांचा अडीच वर्षाचा लहान मुलगा देवांश हा खेळत असतांना छोट्या शेततळ्यात पडला. या शेततळ्याच्या पाण्यात पडून त्याचा दुर्दैवी मत्यू झाला. या घटनेमुळे चिचोडी-रायते गावावर शोककळा पसरली आहे.