इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या काथरगाव परीसरात आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, पक्षाची घरटी, अंडी, किटक अशी प्रचंड हानी झाली आहे. वन्यजीवन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता होत आहे.