नाशिक – ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज येथे शानदार समारोप झाला. त्याचवेळी पुढील म्हणजेच ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी मोठी घोषणा झाली आहे. अथिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी त्याविषयी आजच्या समारोप समारंभावेळी माहिती दिली आहे. पुढील म्हणजेच ९५वे संमेलन हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे. म्हणजेच, पुढच्या संमेलनाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे. तसेच, हे संमेलन येत्या ४ ते ५ महिन्यात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने दृष्य आणि अदृश्य स्वरुपाचे अनेक परिणाम साधले जातात. ही परंपरा यापुढेही उज्ज्वल होत जाईल. आणि ती कायम ठेवण्याची त्याची उंची वाढविण्याची परंपरा कायम ठेवली जाईल, असेही ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.