नाशिक – येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळच्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. लहान मुलांचे भांडण आपण सर्वत्र एेकतो, पण, या शिक्षकांमधील हे लहान मुलांसारखे भांडण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.
शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरु झालेला हा किरकोळ वाद चावा घेण्यापर्यंत गेला. त्यानंतर पोलिस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापकाच्या या हल्ल्यात शिक्षक राजगुरु यांच्या अंगठ्यातून रक्त आल्याने ते जखमी झालेले आहेत. या प्रकरणी राजगुरु यांनी पोलिसात दिलेली ही सविस्तर तक्रार….