मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलन मस्क यांनी आपल्या देशात उद्योग व्यवसाय सुरू करून सर्वाधिक मोठी गुंतवणूक करीत उद्योग व्यवसाय सुरू करून देशातील बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा, यासाठी अनेक भारतीय उद्योजक आणि राजकीय व्यक्ती प्रयत्नशील आहेत, याला मस्क यांनी अडचणी मांडत प्रतिसाद दिला असून याबाबत काय निर्णय होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
एका भारतीयाच्या ट्विटला उत्तर देताना, एलन मस्क भारतात टेस्ला लॉन्च करताना येणाऱ्या समस्यांमुळे व्यथित झाले होते. मस्क यांनी लिहिले की त्यांना अजूनही भारतात अनेक आव्हाने वाटत आहेत. यानंतर भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यांना तेथे कारखाने सुरू करण्याची ऑफर देण्यात आली आहे.
तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी टेस्लाचे सीईओ मस्क यांना त्यांच्या राज्यात युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. रामाराव म्हणाले की, आमच्या सरकारला आव्हानांवर काम करण्यास मदत करण्यासाठी टेस्लासोबत भागीदारी करण्यात आनंद होईल. तसेच पश्चिम बंगाल सरकारनेही टेस्लाला राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
मर्सिडीजने भारतातील आपल्या प्लॅन्सची माहिती दिली, २०२२ हे महत्त्वाचे असेल याच ट्विटला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारतात कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून आवश्यक ती सर्व मदत देऊ. महाराष्ट्रात तुमचा कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आमंत्रण देत आहोत”
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही अॅपल मस्कला पंजाबमध्ये कारखाना सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आणि ट्विट केले की, ‘ आम्ही मस्कला पंजाबमध्ये आमंत्रित करतो. पंजाब मॉडेल लुधियानाला इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उद्योगाचे केंद्र बनवेल. तसेच पंजाब मॉडेल गुंतवणुकीसाठी कालबद्ध सिंगल विंडो क्लिअरन्स प्रदान करेल, त्यामुळे पंजाबमध्ये नवीन तंत्रज्ञान, नोकऱ्या आणि पर्यावरण संरक्षणासह विकासाचा मार्ग मोकळा होईल.
दीर्घकाळापासून भारतात उत्पादन आणि व्यवसाय सुरू करण्यास स्वारस्य दाखवूनही, एलन मस्क यांनी गेल्या वर्षी चिंता व्यक्त केली होती, मस्क असे म्हटले होते की, भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा सर्वात जास्त आहे. सध्या भारतात आयात होणाऱ्या कारवर ६० ते १०० टक्के सीमाशुल्क आकारले जाते.
टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विक्री करू इच्छित आहे. मात्र भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेक मंचांवर म्हटले आहे. तथापि, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला सांगितले आहे की, टेस्लाने भारतात येऊन आधी कार बनवावी, त्यानंतर कोणत्याही सूटचा विचार केला जाईल.
ऑटो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे नाही. कारण येथे टाटा आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांसह, मारुती, ह्युंदाई, एमजी, मर्सिडीज, ऑडी आणि जेएलआर सारख्या कंपन्या आधीच त्यांच्या उत्पादनांसह बाजारात आहेत. अशा परिस्थितीत एक किंवा दोन मॉडेल्सच्या आधारे भारतीय बाजारपेठ टेस्लासाठी खूप आव्हानात्मक आहे. मात्र कोरोना संकट असूनही, काही धोरणांमुळे येथील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वेगाने वाढत आहे.