सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आधीच नैसर्गिकसह विविध संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्याच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे, मनमाड जवळच्या नागापूर शिवारातील शेतकरी यामुळे अडचणीत आले आहे. अज्ञात वन्यप्राणी शेतात घुसून धुमाकूळ घालत मकाच्या बिट्यांचा फडशा पाडत असल्याने वर्षाचे पीक हातातून जाण्याची वेळ नागापूर शिवारातील शेतकऱ्यांवर आली आहे. भाऊसाहेब पवार यांच्या अडीच एकर उभ्या पिकाचा वन्यप्राण्यांनी फडशा पाडला आहे. त्याबरोबर परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान केल्याचा प्रकार समोर आला असून, वनविभागाने तातडीने नुकसान झालेल्या मक्याच्या पिकाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.