इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही वृत्ती आपणासही साधेल का?
जरा कुठे मनाविरुद्ध घडले की संताप करणारी माणसे किंवा जरा कुठे अनपेक्षित काही पुढे येऊन उभे ठाकले की गांगरून जाणारी माणसे आपणास दिसतात. तशीच दुसऱ्याही एका प्रकारची माणसे असतात. कोणत्याही संकटात ती हसतमुख आणि चिंताविहीन अशी दिसतात. सतत उत्साही असतात.
निराश झालेल्यांना पुनरुत्साहित करू शकतात. ही वृत्ती आपणासही साधेल का? साधेल. जे काही घडत आहे ते ‘आपण’ करीत आहोत अशी जर भावना असेल, तर अशी वृत्ती राखणे कठीण जाईल. पण सर्व काही ‘एक महान् शक्ती’ करीत आहे आणि आपण केवळ तिच्या हातची साधने आहोत असे मानले तर ही वृत्ती साधेल.