सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील वासोळ गावातील देवदास नामदेव अहिरे या शेतकऱ्यांनी आपल्या ७० फुटी कांदा चाळीत अंदाजे १३ ट्रॅक्टर कांदा साठवून ठेवला होता. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली. त्यात कांदा चाळीचे व कांद्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान कांदा चाळीला आग लागल्याचे दिसताच आजू-बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणली.