India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यपालांच्या निर्णयावरही सुप्रीम कोर्ट देणार मोठा निकाल… ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…

India Darpan by India Darpan
May 10, 2023
in राष्ट्रीय
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार १० व्या परिशिष्टानुसार विधीमंडळाच्या अध्यक्षाला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी जे काही तोंडी भाष्य केले, त्यावरून असे दिसतं आहे की राज्यपालांची कृती अयोग्य होती. अशाप्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देऊ शकेल, असा अंदाज ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचे सत्ताकारण सध्या तापलेले आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याबाबत वेगवेगळे आडाखे बांधण्यात येत आहेत. या दरम्यान उज्ज्वल निकम यांनी सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने वक्तव्य केले आहे. सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम म्हणाले,‘एका वेगळ्या निरपेक्ष दृष्टीकोनातून विचार केला तर सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका वेगवेगळ्या कृतीवर आधारित आहेत. ही वेगवेगळी कृती असली तरी यातील मूळ कृती अशी आहे की, राज्यपालांनी जेव्हा विशेष सत्र बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सर्व घडामोडी घडल्या आहेत.

त्यामुळे यावर वेगवेगळा निर्णय येईल का? याबाबत मला वाटते की, यामध्ये प्रामुख्याने दोन बाबी महत्त्वपूर्ण आहेत, एक म्हणजे विशेष सत्र बोलवण्याची राज्यपालांची कृती आणि त्यानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेची नोटीस होय. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार १० व्या परिशिष्टानुसार विधीमंडळाच्या अध्यक्षाला आहे. तसेच राज्यपालांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी जे काही तोंडी भाष्य केले, त्यावरून असे दिसते की, राज्यपालांची कृती अयोग्य होती. अशाप्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकणार आहे. सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी जे तोंडी मत व्यक्त केले होते, त्यावरून आपल्याला एक अंदाज लावता येतो. हा केवळ अंदाज आहे, असाच निर्णय लागेल, असे काही नाही.’

सर्वोच्च न्यायालय स्वत: निर्णय घेणार नाही
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय प्रत्यक्ष घेणार नाही. कारण, तो निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. राज्यघटनेत तशी तरतूद आहे. पण, विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीबद्दलही सर्वोच्च न्यायालयात वेगळी याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडही तत्कालीन सरकार कोसळल्यानंतर झाली आहे. त्यानंतरच अनेक घडामोडी घडल्या. या सर्व घटना एकमेकांत गुंतलेल्या आहेत, असे निकम म्हणालेत.

Supreme Court Maharashtra Political Crisis Governor Orders


Previous Post

विधानसभा अध्यक्षांकडे निकाल आला तर काय होईल? उपाध्यक्ष झिरवाळ म्हणाले…

Next Post

…तर उद्धव ठाकरेही होणार मुख्यमंत्री… काहीही होऊ शकते…. विधिज्ञांचा दावा

Next Post
संग्रहित फोटो

...तर उद्धव ठाकरेही होणार मुख्यमंत्री... काहीही होऊ शकते.... विधिज्ञांचा दावा

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group