India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

न्यायालयाच्या निर्णयाने धोका सरकारला नाही तर शिंदे आणि ठाकरेंना… बघा, तज्ज्ञ काय म्हणताय

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, अश्याप्रकारच्या चर्चा होत असल्या तरीही प्रत्यक्षात हा विषय सरकारचा नाहीच. निकाल काहीही लागला तरीही सरकारला कुठलाही धोका पोहोचणार नाही. या निकालाचा केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेवरच काय तो परिणाम होणार आहे.

मुळात शिवसेनेत फूट पडली आणि तिकडले आमदार इकडे आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण एकनाथ शिंदे केवळ आमदार घेऊन आले नाहीत, ते पक्ष आणि पक्षचिन्ह सुद्धा घेऊन आले. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपण पक्षात फूट पाडली नसून केवळ नेतृत्न बदलले आहे, असा युक्तिवाद केला. त्यांच्या बाजुने निकाल लागला तर राजकारणात त्यांचे वजन वाढणार आहे, हे निश्चितच आहे.

पण उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. त्यांनी पक्षाचे नाव काहीही ठेवले तरीही शिवसेनेच्या नावावर निवडून आलेल्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप ऐकावा लागेल. त्यांना आत्ता पक्षातून बाहेरही पडता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे दुसरा काही पर्याय नाही. अश्या परिस्थितीत ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते व नेते शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत बसलेले आहेत, असे कळते.

दुसरे म्हणजे शिंदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर त्यांचे मुख्यमंत्रीपद जाईल, पण सरकार मुळीच कोसळणार नाही. कारण २८८ पैकी १६ कमी होतील आणि २७२ आमदारांचे सभागृह असेल. आता सरकारकडे १६४ आमदार आहेत. त्यानुसार १६४ पैकी १६ गेले तरीही सरकार टिकवण्यासाठी १७२ च्या अर्धेच आमदार हवे आहेत. भाजप-शिंदे गटाकडे निम्म्याहून अधिक आहेत.

अपात्रतेचा निर्णय नाहीच
आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार विधानसभेला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देण्याची शक्यताच नाही. न्यायालयाने अपात्रतेच्या दृष्टीने निरीक्षणे नोंदवली तरीही विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्षांना या आमदारांना अपात्र ठरविणे किंवा पात्र ठरविण्याची प्रक्रिया करण्याचे पूर्ण अधिकार आहेत.

Supreme Court Maharashtra Political Crisis Effect


Previous Post

शिवसेनेची तातडीने बैठक… मुख्यमंत्री शिंदे नाशिक दौऱ्यावर… राज्यातील घडामोडींना वेग… सर्व एका क्लिकवर

Next Post

आयपीएल गुजरात, चेन्नई मजबूत स्थितीत… या संघाचे आव्हान संपुष्टात… अशी आहे पॉईंट टेबलची स्थिती

Next Post

आयपीएल गुजरात, चेन्नई मजबूत स्थितीत... या संघाचे आव्हान संपुष्टात... अशी आहे पॉईंट टेबलची स्थिती

ताज्या बातम्या

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार मोठा धमाका; काय शिजतंय शिंदे गटामध्ये?

June 5, 2023

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group