रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सोशल मिडियात मेसेज फॉरवर्ड करताय? आधी हे वाचा…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 28, 2022 | 4:49 pm
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


अफवा ‍थांबवू या; सतर्क होऊ या…!

सध्या महाराष्ट्रात ‘मुले पळवणारी टोळी’ आली असल्याच्या अफवांचे पीक जोरात आहे. ‘पालघरमधील साधूंचे हत्याकांड, नंदुरबारमधील राईनपाडा येथे नाथपंथीय डवरी समाजातील पाच भिक्षुकांची ठेचून हत्या’ या घटनांपासून आपण काहीच धडा घेतलेला दिसून येत नाही. समाजाने आता जागृत राहत सारासार विचार करून अफवांची सत्यता तपासणे गरजेचे आहे. कायदा हातात न घेता सतर्क व चाणाक्ष राहत आजूबाजूच्या संशयास्पद घटना, व्यक्तींची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे.

माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्‌स ऍपकडे, सोशल मीडियाकडे पाहिले जाते. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात ही माध्यमे खरोखरच प्रभावी आहेत. परंतु, या माध्यमाचा दुरुपयोग होऊ लागला असून, समाजातील काही लोक विवेकशून्य व्यवहार करत कोणतीही शहानिशा न करता ‘मुले पळविणाऱ्या टोळीचे’ फेक व्हिडिओ व फोटो समाजमाध्यमांतून प्रसारित करत आहेत. स्वत:ला सूज्ञ म्हणविणारे आपणही सदर व्हिडिओ, फोटो व अफवांची सत्यता न तपासता फॉरवर्ड करतो. या अफवांमुळे समाजमन प्रक्षुब्ध होत असून निरपराध लोकांचे नाहक बळी जात आहेत.

२०१८ मध्ये महाराष्ट्रात अशाच प्रकारे ‘मुले पळवणाऱ्या टोळी’ च्या अफवांचे पीक आले होते. राज्यात अनेक मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. अशा अफवांमुळे कागद-काच-कचरा गोळा करणारे लोक, भटके, दारोदार जाऊन भिक्षा मागणारे साधू, बहूरूपी, गावा-गावात जाऊन खेळ, कला सादर करणारे लोक, हातगाडीवर वस्तू विकणारे, हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांकडे नागरिक संशयाने पाहू लागतात. एखाद्या व्यक्तींने संशय घेतल्यावर मग हळूहळू आजूबाजूचा समुदाय, नागरिक जमा होऊ लागतात. मग त्या जमावाला झुंडीचे स्वरूप येऊन लोक प्रक्षुब्ध होत कायदा हातात घेत त्या व्यक्तीला रक्तरंजित होईपर्यंत मारहाण करतात.

यातून निष्पाप, निरपराध व्यक्तीचा हकनाक बळी जातो. उत्तर महाराष्ट्र, सांगली, सातारा व कोल्हापूर तसेच नागपूर या भागांमध्ये अफवा मोठ्या प्रमाणात पसरविण्यात आल्या. या अफवांची त्या-त्या जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने शहानिशा व सखोल चौकशी केली असता या अफवा तथ्यहीन व खोट्या आढळून आल्या आहेत. शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सतर्क असून अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो. त्यामुळे अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये किंवा मनात भीती बाळगू नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळोवेळी करण्यात येत आहे.

अफवांवर नागरिकांनी सतर्क राहून काय काळजी घ्यावी –
• संपूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतेही टेकस्ट मॅसेज, बातमी, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे टाळावे.
• कोणतीही माहिती स्वत: पडताळणी व सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका.
• कोणत्याही अफवा पसरविण्यात सहभागी होऊ नये व कोणी असे करत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
• अनोळखी व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरात वावरतांना दिसून येत असेल तर सतर्क होऊन त्या व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आपल्या भम्रणध्वनीच्या माध्यमातून रेकॉर्ड करा, आपणास काही संशयास्पद आढळल्यास स्थानिक पोलिसांशी डायल १०० वरून किंवा ११२ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा.
• गैरसमजातून यापूर्वी अनेक अनुचित प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात न घेता संबंधित व्यक्तीस मारहाण करू नये. पोलिसांची मदत घ्यावी.

अफवा पसरविणाऱ्यावर होऊ शकतो गुन्हा – अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पोलीस अफवा निर्माण करणाऱ्या व पसरविणाऱ्या व्यक्तींवर सायबर अ‍ॅक्ट नुसार कारवाई करतात. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह कमेंट टाकल्याच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदाच्या ६६ अ कलमाच्या जोडीलाच भारतीय दंडसंहितेचे कलम, २९५ (क), १५१ (१), ५०५ (१) नुसार गुन्हा नोंदविला आहे. भारतीय दंड संहितेची ही अतिरिक्त कलमे लावल्यामुळेच आक्षेपार्ह पोस्टबद्दल व्यक्तींना अटक झाली आहे. ‘भादंवि’च्या कलम २९५ (क) अन्वये विशेषत्वाने धार्मिक भावना दुखावणे, १५३ आणि १५३ (अ) अन्वये दंगलीस चिथावणी देणारी, जातीय तणाव किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी विधाने लिखित वा बोली स्वरुपात केल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्याची तरतूद असून, त्यासाठी सहा महिने ते एक वर्षाची तुरंगवास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. तर कलम ५०५ अन्वये, कायदा-सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी आपल्या विधानातून अफवा पसरवणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरंगावास व दंडाची तरतूद आहे. या कलमांचा वापर करून पोलीस समाजात अशांतता पसरविणाऱ्या समाजकंटक लोकांच्या मुसक्या आवळत आहेत.

समाजमाध्यमांद्वारे फेक न्यूज, द्वेषमूलक वक्तव्य आणि अफवा पसरवणे याबाबत जनतेला जागरुक आणि सतर्क करण्यासाठी पोलीस व प्रशासन काम करत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सोशल मिडिया हँडलद्वारे जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहाचविली जात आहेत. नागरिकांनीही आता समाजमाध्यमांच्या वापराबाबत सजग व शिक्षीत होत अफवांना थारा देऊ नये…!

संकलन – उपमाहिती कार्यालय, शिर्डी.
Social Media Forwarded Messages Alert

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार

Next Post

टाटांनी लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Jayant Patil e1701442690969
संमिश्र वार्ता

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यावर जयंत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया….

सप्टेंबर 14, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा हायव्होल्टेज सामना रद्द होणार? पडद्यामागे हालचाली सुरु

सप्टेंबर 14, 2025
modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
Next Post
Tata Tiago EV

टाटांनी लॉन्च केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011