मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. ते गेल्या ५० दिवसांपासून कोठडीत आहेत. आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ते येत्या ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच राहणार आहेत. म्हणजेच त्यांची नवरात्रही तुरुंगातच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २१ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपपत्र संजय राऊत यांच्याकडे सोपवले आहे. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी ईडीच्या विशेष न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. विशेष म्हणजे राऊत हे एका महिन्याहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्याला ३१ जुलै रोजी ईडीने अटक केली होती.
यापूर्वी संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यावेळी न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर संजय राऊत यांनीही ईडी तपास सुरू ठेवू शकते, पण तुरुंगात ठेवल्याने काही होणार नाही, असे म्हटले होते.
पत्रा चाळ घोटाळा २००७ साली उघडकीस आला होता. मग महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने (म्हाडा) चाळींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी सदनिका बनविण्याची योजना सुरू केली. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये हे काम होणार होते. पत्रा चाळच्या पुनर्विकासाचे काम गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. म्हाडाच्या ४७ एकर जागेत ६७२ घरे बांधण्यात आली आहेत. कंपनीला साडेतीन हजार फ्लॅट्स बनवायचे होते. सदनिका बांधल्यानंतर उर्वरित जमीन विकली जाईल, अशी म्हाडाची योजना होती. मात्र, १४ वर्षे उलटूनही कंपनीने येथे फ्लॅट बांधले नाहीत. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने म्हाडाची फसवणूक करून सदनिका न बांधता जमीन बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे. यामुळे ९०१ कोटींहून अधिक नफा झाला.
Shivsena MP Sanjay Raut ED Court Hearing Custody
Patra Chawl Scam