इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे राज ठाकरे व उध्दव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगलेलली असतांना शिवसेना ठाकरे गट व मनसेच्या नेत्यांबरोबरच इतर पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेच्या ठरल्या आहे. कोणी सल्ला देत आहेत तर कोणी शुभेच्छा…यामुळे हा युतीचा विषय सध्या चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
आता शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला –
उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते श्री. नारायणजी राणे, स्व.श्री. मनोहरजी जोशी, श्री. दिवाकरजी रावते, श्री. लीलाधर डाके, श्री. रामदासभाई कदम आणि श्री. एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो – जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील.