डांगसौंदाणे – सध्या समाजातील मूल्ये घटत चालली असून माणूस आपल्या मूळ ध्येयापासून दूर चालला आहे. आज माध्यमांमधून सकारात्मक बातमी ऐवजी नकारात्मक बातम्याच जास्त पाहायला मिळू लागल्या आहेत. अशा या काळात मूल्याधिष्ठित पिढी घडावी यासाठी पत्रकारांवर खऱ्याअर्थाने मोठी जबाबदारी येऊन पडली आहे; असे प्रतिपादन मालेगाव येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.मल्हार देशपांडे यांनी केले. ते येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे ओम शांती मीडिया आयोजित पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी केंद्राच्या प्रमुख राज योगिनी भगिनी अंजू दीदी यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांचे शाल गुलाबपुष्प व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला अंजू दीदी यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या पत्रकारांचे कार्य ही समाजातील डॉक्टर शिक्षक यांच्या प्रमाणेच खूप मोठे असल्याचे त्यांनी सांगितले यामुळेच पत्रकारांवर समाजाला दिशा देण्याची व मूल्यवान पिढी घडविण्याची जबाबदारी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले मालेगाव येथील प्रा.खैरनार यांनी आपले राजयोग विषयी मनोगत व्यक्त केले.
सर्व पत्रकारांच्या वतीने सुनील येवला यांचा पुष्पहार देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व माऊंट आबू प्रणित मीडिया स्वागत गीताने करण्यात आली. वृषाली दीदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उपस्थित पत्रकारांच्या वतीने शशीकांत कापडणीस यांनी आभार आयोजकांचे आभार माणलेत सदर कार्यक्रमासाठी बागलाण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश गौतम, रमेश देसले, काशिनाथ हांडे, देवेंद्र वाघ, शशिकांत कापडणीस, दिपक सूर्यवंशी, किरण दशमुखे, राकेश येवला, प्रशांत कोठावदे, गणेश सोनवणे,वैभव नंदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.