सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

संयुक्त किसान मोर्चात फूट; शेतकरी नेत्यांची वेगवेगळी वक्तव्ये

by Gautam Sancheti
जानेवारी 17, 2022 | 4:32 pm
in राष्ट्रीय
0
kisan ekta morcha

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याबाबत संयुक्त किसान मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद कायम आहेत. मोर्चाची रणनीती बनवणाऱ्या नऊ सदस्यीय कोअर समितीच्या सदस्यांमध्ये या मुद्द्यावरून सध्या दोन गटात पडले आहेत. दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा निवणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय नवी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

तरीही शनिवारी सिंघू बॉर्डवर झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी लखीमपूर खिरी प्रकरणात समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे फेब्रुवारीपासून मिशन उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सुरू करण्याची घोषणा केली. ३१ जानेवारीला जिल्हापातळीवर ट्रॅक्टर मोर्चा किंवा धरणे दिल्यानंतरही केंद्रीय राज्यमंत्री अजय टेणी यांना बर्खास्त केले नाही तर ते लखीमपूर खिरी येथे मोर्चा काढण्यात येणार आहे, असे टिकेत म्हणाले.

टिकेत यांच्या या वक्तव्यावर मोर्चाच्या कोअर कमिटीचे तीन सदस्य आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण शुक्रवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत टिकेत यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. तसेच लखीमपूर खिरी हा कोअर कमिटीच्या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दाही नव्हता. हा विषय पुढील कोअर कमिटीच्या बैठकीत मांडण्याचा विचार असल्याचे या सदस्यांनी सांगितले.

हन्नान मुल्ला यांच्या या प्रस्तावाशी योगेंद्र यादव सहमत नव्हते. शुक्रवारच्या बैठकीत हरियाणाचे शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी आणि पंजाबमधील बलबीर सिंग राजेवाल उपस्थित नव्हते. त्यांच्या प्रतिनिधींनी या कोअर कमिटीमध्ये सहभाग घेतला होता. किसान मोर्चा राजकारणापासून दूर राहणार असल्याचा निर्णय शनिवारी सिंघू बॉर्डर येथील बैठकीनंतर स्पष्ट करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी कोअर कमिटीच्या बैठकीत ठरले होते.

शनिवारच्या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी किसान मोर्चाला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवणार असल्याचे सांगितले होते. परंतु राकेश टिकेत यांच्या वक्तव्यानंतर सर्व काही बदलले आहे. टिकेत यांच्या वक्तव्याने मोर्चाकडून केंद्र सरकारला देण्यात येणारे शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भातील मागणीपत्र मागे पडले आहे. यामध्ये किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीबद्दल समिती बनविण्यापासून ते मृत शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एअरटेलचे हे प्लॅन घ्या आणि वर्षभर मोफत बघा चित्रपट आणि शो

Next Post

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव तातडीने सुरु करा, अन्यथा रास्ता रोको; भारत दिघोळे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

पराभवानंतरही पाकिस्तान संघाला मिळाले इतके कोटी….संजय राऊत यांनी सांगितला धक्कादायक आकडा

सप्टेंबर 15, 2025
VO7rnvQq 400x400 e1757903064573
राष्ट्रीय

संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण खरेदी नियामावलीला दिली मंजुरी…हा होणार फायदा

सप्टेंबर 15, 2025
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन 5 1024x683 1
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन…आज शपथविधी

सप्टेंबर 15, 2025
Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
भारत दिघोळे

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव तातडीने सुरु करा, अन्यथा रास्ता रोको; भारत दिघोळे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011