नवी दिल्ली : देशातील कोणत्याही बँकेने ग्राहकांचे हित व देशाचा आर्थिक विकास हेच त्यांचे उद्दिष्ट असावे, असा नियम तथा धोरण आहे. मात्र काही बँका या नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रिझर्व बँकेला कारवाई करावी लागते. अशाच प्रकारे ग्राहकांचे हित लक्षात घेण्यास टाळाटाळ केल्याने देशभरातील सहकारी क्षेत्रातील ४ मोठ्या बँकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामुळे सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये खळबळ उडाली आहे.
देशातील वेगवेगळ्या सहकारी बँकेांवर निर्बंध जारी केले आहेत. या बँकांनी निर्धारीत नियमांना महत्व न दिल्याने केंद्रीय बँकेने त्यांना दणका दिला आहे. या गोष्टीचा परिणाम खातेदारांवरही झाला आहे. खातेदारांना आता त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढता येणार नसून त्यांना आता एकावेळी फक्त १० हजार रुपये काढता येणार आहेत. या बँकांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्याने त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली.
आरबीआईच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, पश्चिम बंगाल द सूरी फ्रेंड्स यूनियन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, सूरी, उत्तर प्रदेशातील बहराइच येथील नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव बैंक लि. तसेच बिजनोर येथील युनायटेड इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर हे सक्तीचे निर्बंध घालण्यात आले आहेत.
या बँकेच्या खातेदारांना आता खात्यातून रक्कम काढताना मर्यादांचा सामना करावा लागणार आहे. तसेच त्यांच्या त्यांच्या चिंतेत देखील भर पडणार आहे. यापूर्वी आरबीआयने राज्यातील रायगड सहकारी बँकेवर नुकतेच निर्बंध लावले आहेत. पुढील ६ महिन्यांपर्यंत या सहकारी बँकांवर हे निर्बंध कायम राहणार आहेत. बँकिंग विनियमन अधिनियम, १९४९ नुसार जारी निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून नियम आणि मापदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५७.७५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, यापुर्वी रिझर्व्ह बँके कडून रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकाला प्रत्येकी कमाल १५ हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेला नवीन कर्ज मंजुरी करता येणार नसून ठेव ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही जुन्या कर्जाचे बँकेला परत नुतनीकरण करता येणार नाही.
गुंतवणूकदारांकडून नव्याने गुंतवणूक करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी याविषयीचे निवेदन केले आहे, त्यानुसार, बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून १५ हजार रुपयांहून अधिकची रक्कम काढता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निर्बंध करताना केंद्रीय बँकेने हे स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी बँकेवर लागू असतील तसेच हे निर्बंध म्हणजे रायगड सहकारी बँकेचे बँकिंग परवाना रद्द करण्यात येणार आहे असा होत नाही. यापूर्वी देखील रिझर्व बँकेने सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अनेक बँकांवर निर्बंध लादले होते गेल्या वर्षभरात सुमारे वीज बांधकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.