नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे आजच संसदेच्या पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे मागे घेणारा प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांचेही त्याकडे लक्ष लागले आहे. तसेच, गेले अधिवेशन विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले आणि संसदीय कामकाज कमी झाले. आताच्या अधिवेशनात नक्की काय होणार, सरकारची काय भूमिका आहे, विरोधकांकडून काय अपेक्षित आहे यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सभागृहात जाण्यापूर्वी प्रतिपादन केले आहे. बघा, ते माध्यमांशी बोलताना काय म्हणाले
Speaking at the start of the Parliament session. https://t.co/IvHdsOocbx
— Narendra Modi (@narendramodi) November 29, 2021