अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अतीवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील कजवाडे गावातील नदीवर असलेल्या मोरीचा भराव वाहून गेल्याने नदीवर केवळ पाईप, दगड-गोटेच उरले आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाताना-येताना मोठा त्रास करावा लागत असून नदीपत्रातून जीव मुठीत घेऊनच नदी पार करावी लागत आहे. त्यामुळे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी पालकांना नदीकाठी थांबावे लागते. बंदरे विकास व खाणमंत्री दादा भुसेंनी देखील या पुलाची पाहणी केली असून, या पुलाची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.