इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात पालकांना मुख्य काळजी असते, ती मुलांवर संस्कार कसे करावेत ? याची कारण सध्याच्या परिस्थितीत कार्यबाहुल्यामुळे पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तसेच त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे आपली मुले नेमकी काय करतात? याकडे त्यांचे नकळत दुर्लक्ष होते. परंतु पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे किंवा त्यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असते. कारण काही वेळा आपल्याच मुलांमध्येच वाद किंवा भांडण होऊन इर्षा निर्माण होऊन द्वेष देखील निर्माण होतो. किंवा एक मुल दुसऱ्या मुलावर दादागिरी करू शकते त्याचा त्याच्या जीवनावर दूरगामी आणि वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच कोणत्याही एका मुलाची बाजू घेणे टाळावे.
लहानपणी घडलेल्या काही घटना अशा असतात की, आपल्या कायम लक्षात राहतात. यामध्ये वाईट गोष्टी अधिक घडतात. आपल्या भावंडांसोबत मोठे झाल्यानंतर चांगले संबंध असतात, परंतु तरीही त्यांना लहानपणीच्या अशा काही गोष्टी आठवतात, तेव्हा त्यांना आपल्या भावा-बहिणींबद्दल कटू वाटते किंवा राग येतो.
एका अभ्यासानुसार, ज्यांना लहानपणी आपल्या भावंडांकडून त्रास दिला जातो, ते लहान सहान गोष्टींवरही आपल्या भावंडांवर रागावतात. काही वेळा लहानपणी केलेल्या शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मोठे झाल्यावरही लोकांच्या मनात भावंडांबद्दल सॉफ्ट कॉर्नर राहत नाही. मोठे झाल्यावरही ते भावंडांशी जोडले जात नाहीत. अशा वेळी पालक म्हणून आई वडीलांची जबाबदारी वाढते.
भावंडांमधली भांडणे सर्रास घडतात, पण एकाही मुलाने दुसऱ्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण केले नाही, हे पालकांनी पाहिले पाहिजे. या भीतीच्या वातावरणामुळे मूल नेहमी त्याच्या मोठ्या किंवा लहान भावंडांकडून दडपले जाते. आपल्या रागावलेल्या भावाविरुद्ध किंवा बहिणीविरुद्ध काही बोलल्यास त्याला शिक्षा होईल, असे त्याला वाटते. भीतीमध्ये, मुलाचे व्यक्तिमत्त्व भित्रा आणि नकारात्मक बनते. कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की भीतीपोटी, मूल लपण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करते, ते दादागिरी करणाऱ्या भावंडाचा सामना करू शकत नाही.
अनेकदा पालक नैतिक मूल्याच्या नावाखाली मोठ्या मुलाची किंवा लहान मुलाची बाजू घेतात. लहान मुलाला अनेकदा मोठ्या भावा-बहिणीचे सर्व म्हणणे पाळण्यास सांगितले जाते किंवा काही पालक नेहमी घरातील लहान मुलाची बाजू उचलून धरण्यास मोठ्यांना सांगतात, तर नैतिक मूल्ये बाजूला ठेवून प्रत्येक पालकाने बरोबर काय चूक हे पाहणे गरजेचे आहे. मुलांना पक्षपात न करता प्रेमाने शिकवले पाहिजे.
प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्व वेगळे असते, त्यामुळे एका मुलाची दुसऱ्याशी कधीही तुलना करू नका. असे केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्याचबरोबर आपल्या भावा-बहिणींबद्दल राग, मत्सर, द्वेष या भावनाही त्यांच्या मनात निर्माण होतात. पालकांनी आपल्या सर्व मुलांना सुरक्षित वाटावे, जेणेकरून मुले कोणत्याही दबावाखाली राहू नयेत.