नाशिक – ग्रामीण भागात दळणवळण सहज आणि सोपे व्हावे यासाठी रस्त्यांचा विकास आणि रस्त्यांच्या मजबुतीसाठी शासनाने डिसेबंर २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात लेखाशिर्ष ५०५४ अंतर्गत बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून सिन्नर,इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या चार तालुक्यातील सात महत्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबूतीकरण होणार आहे. रस्त्यांच्या मजबूतीसाठी खा.गोडसे यांनी तेरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामिण भागातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने मंजुर केलेल्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या मजबूतीकरणामुळे ग्रामीण भागातील शेतीमालाची वाहतूक विना आयास होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
ग्रामिण भागातील खेडयाचा विकास साधायचा असल्यास रस्त्याचा विकास आणि रस्त्यांचे मजबूतीकरण होणे गरजेचे असल्याने खा.गोडसे यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. यासाठी गोडसे यांनी मंत्रालयात जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधीसाठी साकडे घातले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. शासनाने डिसेबंर २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात लेखाशिर्ष ५०५४ अंतर्गत बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये वाडिवऱ्हे-दहेगाव -जातेगाव -तळेगाव या रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी दिड कोटी,वाडिवऱ्हे-दहेगाव -जातेगाव -तळेगाव -महिरावणी या रस्त्यावरील किलोमिटर मिटर६२ / ४६० ते ६६ / ५०० या दरम्यानच्या रस्ता मजबूतीसाठी दोन कोटी रुपये, धोंडेगाव -लाडची – विळवंडी ते तालुका हद्द या कि.मी ४६ / ३०० ते ५२ /० ० या दरम्यानच्या सत्ता मजबूतीसाठी दोन कोटी, वाडिवऱ्हे-दहेगाव -जातेगाव -तळेगाव – महिरावणी -गिरणारे कि. क्र. ६९ / ०० ते ७२ / ०० या दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा करणेकामी दिड कोटी, भगुर-नानेगाव -पळसे या दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा करणेकामी दोन कोटी तर पांढुर्ली – भगुर- नाशिकरोड या रस्त्याच्या सुधारणाकामी सव्वा कोटी धोंडेगाव – लाडची -विळवंडी ते नाशिक तालुका या दरम्यानच्या कि.मी. ५२ / ०० ते ५६ / ३०० रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये या महत्वाच्या कामांचा समावेश आहे. वरील सातही रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.