नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचे नॉट रिचेबल होणे, सर्वांना धक्का देणारे होते. दिवसभर अनेक लोक त्यांचा फोन ट्राय करत होते, पण त्या नॉट रिचेबल आल्याने निवडणुकीने आणखी कोणते वळण घेतले, याबाबत चर्चा सुरू झाली. अश्यात त्या थेट विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यामुळे चर्चा थांबली.
शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात आल्यानंतर त्यांनी आपण उमेदवारीवर कायम असल्याचे स्पष्ट केले. आपल्यावर कुणाचाही दबाव नाही. धनशक्ती जिंकणार की जनशक्ती, हे वेळच ठरवेल, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शुभांगी पाटील यांना अखेरपर्यंत एबी फॉर्मच मिळाला नाही. शिवाय भाजपनेही कोणताच उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे भाजपची भूमिकाच संशयास्पद असल्याचे जाणवू लागले. अश्यात काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाल्यावरही डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतली आणि मुलगा सत्यजित तांबेला अपक्ष निवडणूक लढवायला सांगितले. भाजप तांबेंच्या पाठिशी असल्याचे बोलले जात आहे. पण शुभांगी पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचे सांगून महाविकास आघाडीचे समर्थन असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडी माझ्या सोबत आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
नॉट रिचेबल शुभांगी पाटील समोर आल्यावर काय म्हणाल्या? #ShubhangiPatil #SudhirTambe #SatyajeetTambe #UddhavThackeray pic.twitter.com/rGO8bZRi0C
— Mumbai Tak (@mumbaitak) January 16, 2023
भाजप नेमके कुणासोबत?
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पाठिशी भाजप असल्याचे बोलले जात असतानाच दुसरे अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एक तासाच्या चर्चेत त्यांनी भाजपला पाठिंबा मागितल्याचे सांगितले.
ठाकरे गट सोबत नाही
शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीचा पिठांबा मागितला असला तरीही उद्धव ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा दिलेला नसल्याचा दावा दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीत अधिकच रंगत येणार आहे.
Nashik Graduate Election Candidate Shubhangi Patil Says
Politics Vidhan Parishad